फॉलोअर

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

माझा दोस्त...!!



दोस्त या शब्दाला जो आवेग आहे.. तो इतर कुठल्याही समानअर्थी शब्दात येऊ शकत नाही... पण या शब्दाचा अर्थ अगदी मनापासून येऊन भिडला तो आज.. तो माझ्या जवळ आला.. अगदी निरागस हसला.. आणि मला घट्ट मिठी मारली... दोन सेकंद काय होतंय हे समजण्यासाठी गेले... पण मी त्याच्या मिठीतली निरागस, निस्वार्थ उब मी अनुभवली.. आणि एक निराळा निशब्द संवाद सुरु झाला... समाजाच्या दृष्टीने 'तो' मतीमंद... ते उपेक्षित आहेत याची आपल्याच मनाशी समजूत काढण्यासाठी दिलेला आणि एक शब्द म्हणजे विशेष... ती विशेष आहेत याचा छुपा अर्थ आमच्याबरोबरची नाहीत असाच...!!.. रूढार्थाने अंगवळणी पडलेले हे शब्द का कोण जाणे मला अजिबात वापरावेसे वाटत नव्हते.. पण आज त्या मिठीने मला अगदी जवळचा शब्द मिळून दिला... दोस्त...!
कामयानी या संस्थेत अशा काही दोस्तासमावेत मैत्रीदिन साजरा करावा अशी एक कल्पना पुढे आली आणि सार्यांनीच उचलून धरली.. त्या मुलांना आवडेल असे काहीतरी घ्यावे म्हणून काही काही घेऊन गेलो..मी, दीपा, धनश्री, राहुल, हीना, प्रिया, दीपक, पाध्ये असे सारेजण दुपारी कामायनी मध्ये गेलो... शाळा एव्हाना सुटायची वेळ जवळ आली होती.. त्यांचे एक शिक्षक आम्हाला एका वर्गात घेऊन गेले तिथे केस पिकलेली पण मानाने मुलच असणारी मुले गणवेश घालून काम करण्यात गुंग झाली होती... हे कोण पाहुणे आले अशा काहीशा नजरेने ते आमच्याकडे पाहत होते.. अवघ्या ५ मिनिटात १०० हून अधिक दोस्त जमा झाले.. आता काय याची उत्सुकता प्रत्येक मुलांच्या नजरेय होती... अनेकांच्या हातात अगोदरपासुनच मैत्रीचे धागे होते पण नवे दोस्त मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून अक्षरशः ओसंडून वाहत होतं... सारी मुले गोल रिंगण करून उभी राहिली आणि मध्ये आम्ही...!! इतरापेक्षा आपण वेगळे आहोत असं म्हटल्यावर की वाटत असेल याची जणू ती झलकच होती.. पण आम्ही स्वताला सावरलं आणि त्या मुलामध्ये रमायचा प्रयत्न करू लागलो.. पण खरं संग्याचा तर आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हि जाणीव सुप्तपणे आतून टोचत होतीच त्यामुळे सुरवातीला ते मिसळणहि नैसर्गिक नव्हतं... पण वातावरण त्याच मुलांनी मोकळं केलं... अगदी सहजतेने दादा, ताई, मावशी, काका अशा हाक सुरु झाल्या... त्यांच्या कोवळ्या हातात धागे बंधू लागलो तसा त्यांच्या चेहर्यावरचा आनंद लपेना... हातात हात घेऊन, निरागस हसत ते आपले भाव व्यक्त करत होते... ''माझं नाव प्रदीप.. तुझं??'' असं अगदी हक्काने विचारत होते... आम्ही सुरवातीपासून जपलेले एक हाताचे अंतर त्यांनीच एका क्षणात कमी केले होते... आवडलेल्या प्रत्येक गोष्टीला टाळ्या वाजवून दिलखुलास दाद देत होते..
हे सगळे सुरु असतानाच मुलांमधल्या गर्दीतून वाट काढत तो माझ्याजवळ आला... शब्दांची जुळवाजुळव करून मी काही बोलू पाहणार इतक्यात तो हसत न बोलता माझ्या मिठीत शिरला... वयाने मोठा परंतु तरीही निरागसतेच अमृत जपलेल्या त्याला मिठीत घेतलं आणि पाठीवरून हात फिरवला तेव्हा मला माझ्या दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेतल्याची उब जाणवली... शब्दाविना स्पर्श खूप काही बोलून जातो तो असा...!!!
पुन्हा नक्की भेटण्याचे आश्वासन देत आम्ही निघालो पण हि सारी मुले मनातून काही केल्या जाईनात. बाहेर आलो तेच प्रत्येक जण आतून शांत होता... काहीतरी दिलं म्हणण्यापेक्षा स्वतःलाच काहीतरी गवसला होत.. खूप काही करता येण्यासारखं आहे... खूप काही करूयात.. असे निर्धारही झाले.. पण मनातल्या कोरड्या ठाक पडत चाललेल्या जमिनीवर या मुलांनी निशब्दपणे पाणी शिंपडले.. आणि आशेचा नवा अंकुर मात्र मनात रुजला ... निरागसतेने मैत्रीचा हात पुढे केला होतां आता तितक्याच जिंदादिलपणाने त्याला प्रतिसाद देणं आमच्या हाती होत...
या दोस्ताना आनंदाचे काही क्षण देण्यासाठी म्हणून आम्ही गेलो खरे पण त्यांनीच आम्हाला आनंदाची ठेव दिली... !!
त्यांच्याहि आठवणीच्या कप्प्यात आम्हाला एक 'विशेष' जागा मिळेल??.. नक्कीच...!!!!

शनिवार, ९ जुलै, २०११


'सहावा' दरवाजा बंदच राहू द्या..
पद्मनाभ मंदिरामध्ये १ लाख कोटी रुपयांची संपत्ती सापडली हि बातमी गेल्या आठवड्यापासून गाजते आहे.. सत्य साईबाबा तुलनेत अगदीच गर्रीब बिच्चारा वाटावेत इतकी प्रचंड संपत्ती या एकाच ठिकाणी सापडलेली आहे...
सत्य साईबाबांच्या संपत्तीचे नवनवे आकडे समोर येत असताना, केरळमधील तिरुवनंतपुरम येथे असलेल्या पुरातन पद्मनाभस्वामी मंदिराची संपत्ती त्यावर कडी करेल, असे दिसत आहे. या संपत्तीची मोजदाद सुरू असून ती किमान एक लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

योगनिदेच्या रूपात असलेल्या विष्णुचे हे मंदिर फार पुरातन असे मंदिर आहे... सहाव्या ते नवव्या शतकातील तमिळ संतांच्या साहित्यात या मंदिराचा उल्लेख आढळतो. वैष्णवांच्या पवित्र स्थानांपैकी महत्त्वाचे स्थान म्हणून या मंदिराला महत्वाचे मानले जाते.. अठराव्या शतकापर्यंत त्याचा जीणोर्द्धारहि करण्यात आलं होतं...
या मंदिरात असलेल्या संपत्तीची सुरक्षा करण्यास मंदिर समर्थ नाही. त्यामुळे या मंदिराच्या कारभाराची जबाबदारी सरकारने घ्यावी,' अशी जनहित याचिका टी. पी. सुंदरराजन या स्थानिक वकिलाने केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पद्मनाभ मंदिरातील सहा बंदिस्त खोल्यांचे दरवाजे उघडून संपत्तीची मोजदाद करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मंदिराचे एक एक दरवाजे उघडून त्यातील संपत्तीची मोजदाद करण्याचे काम सुरु झाले... केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश एम. एन. कृष्णन यांची मोजदाद समिती नेमण्यात आली असून या समितीने मोजदाद सुरु केली... या मंदिराचा कारभार अजूनही त्रावणकोरच्या राजघराण्याकडेच आहे.

कुबेराची संपत्ती....!!!
* सोन्याचे तीन मुकुट, सोन्याने आणि रत्नांनी मढवलेल्या सहा पट्ट्या, सोन्याचे हिरेजडित पंधरा फुटी हार (प्रत्येक हार दहा किलो वजनाचा), सोन्यात घडवलेल्या देवांच्या मूर्ती, चार फूट उंचीची सोन्याची हिरेजडित विष्णुमूर्ती, सोन्या-चांदीची असंख्य नाणी, महागडी भांडी, हिरे-माणिक-मोती अशी संपत्ती आतापर्यंत सापडली आहे.
* पाच हजार कोटींच्या संपत्तीची मोजदाद पूर्ण झाली. एकंदर संपत्ती एक लाख कोटी रुपयांची (२२.३ अब्ज डॉलर) असल्याचा अंदाज. त्यापैकी पन्नास हजार कोटी रुपयांचे दागिनेच असल्याचा आडाखा.
* गेले दोन दिवस सुरू असलेली मोजदाद पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता. १८८० मध्ये या मंदिराच्या दोन खोल्या उघडल्या होत्या, त्यावेळी कोट्यवधींची संपत्ती सापडली होती. ही संपत्ती जमिनीच्या खाली वीस फूट खोल लपवली होती.

त्रावणकोरच्या महाराजांची संपत्ती शत्रूपासून लपविण्यासाठी मंदिरात भुयार करून तेथील खोल्यांमध्ये शाही खजिना दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी लपवण्यात आला असावा.
जरा करूया तुलना...
* देशाचे बजेट : १२,५७,७२९ कोटी रुपये
* आरोग्यासाठीची तरतूद : २६,७६० कोटी रुपये
* शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद : ५२,०५० कोटी रुपये
* भारतावरील कर्ज : सुमारे १५ लाख कोटी रुपये (२०१०-११)
* महाराष्ट्राचे बजेट : ७,६५४ कोटी रुपये (२०१०)
* मुकेश अंबानींची संपत्ती : १,३५,००० कोटी रुपये
हा सगळा झाला आजवरच्या घडामोडींचा निव्वळ आलेख... खरं मुद्दा या पुढेच आहे... या पद्मनाभ मंदिराचा सहावा दरवाजा उघडावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत... आत्तापर्यंत जितकी संपत्ती सापडली आहे त्यापेक्षाही अधिक संपत्ती या सहाव्या दरवाज्याच्या आड लपलेली आहे असं अनेकांचा कयास आहे... पलीकडे संपूर्ण सोन्याने भरलेली नाव, सोनेभरून राहिलेल्या विटा ब त्याने भरलेल्या विहिरी आणि अजून कित्येक अंदाज बांधले जात आहेत... या दरवाज्यापलीकडे किमान ५ लाख कोटी पेक्षा अधिक संपत्ती असावी असं अनेकांचा अंदाज आहे... तर दुसर्या बाजूला काहीही झाले तरीही हा शेवटचा दरवाजा उघडू नये अशी राजघराण्याची, पुजार्यांची श्रद्धा आहे... सहाव्या दरवाज्यावर असणाऱ्या नागाच्या मूर्ती रक्षक असून त्यांना ओलांडणे शुभ नाही... इथपासून ते सहावा दरवाजा उघडला तर थेट समुद्रामध्ये जातो.. साम्द्राचे पाणी त्यात शिरून मंदिरच पाण्याखाली जाण्याची भीती आहे... मंदिराचा आधार सहाव्या दरवाजात आहे.. तो उघडल्यास तो आधारच नाहीसा होऊन मंदिर कोसळू शकते अशी भीती वर्तवली जात आहे...

परंतु घटना, घडामोडी, परिस्थिती, अंदाज या सर्वांच्या पलीकडे जाऊन या पद्मनाभ मंदिराच्या घटनेकडे पाहायचा प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते... या मंदिराची घटना आपल्याला काही सांगू तर पाहत नाही ना... थोडासा थांबून याचा विचार व्हायला हवा असे वाटते... समाजात विविध स्तरावर निर्माण झालेल्या बजबजपुरीमध्ये पद्मनाभ मंदिराची घटना खूप काही सांगून जाणारी आहे.. त्यातून आपण काही बोध घेतो का हे मात्र फार महत्वाचे आहे...

समाजात अशांतता, अस्वस्थता भरून वाहत असताना.. एका आकस्मिक संधीच्या रूपाने पद्मनाभ मंदिरातील संपत्ती उघड झाली.. इतकेच नव्हे कुणी कल्पनाही केली नसेल इतकी म्हणजे १ लाख कोटी रुपये... इतकी प्रचंड संपत्ती दिली.. अर्थात निसर्गाने देतात्ना पुन्हा हाथ आखडता घेतला नाही... नेहमीसारखेच भरभरून दिले... पण इतके हाती येऊनही आम्हाला सहाव्या दरवाज्याची हाव सुटत नाही... पाच दरवाजे उघडून अमाप संपत्ती मिळूनही साधन नाही.. अजून हवेच... या हावरटपणाने सहावा दरवाजा उघडावा आणि अधिक संपत्ती मिळवावी हि सुप्त हाव दिसून येत आहे...!!

मला वाटतंय कि तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच जीवनात अनेक पावलावर हा सहावा दरवाजा येत असतो.. कुठे थांबायचे हे आपल्या आयुष्यात आपल्याला समजले कि पुढची फरफट थांबत असते.. आज नेमके हेच समाजात नसल्याने आपण सारेच नुसते मिळवण्यासाठी धावत आहोत.. पण समाधान कोणत्याच पातळीवर होताना दिसत नाही.. पद, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान, या सार्याच्या मागे बेभान होऊन धावतो.. मिळू लागले कि समाधानाची वृत्तीच गायब होते आणि मग आणखी हवे चा एक वाईट हव्यास सुरु होतो... अपेक्षा बाळगणं वाईट नाही पण दिशा विसरून अपेक्षान्मागे पळत राहणं खरच चुकीचा आहे... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सध्या एक नवा सहावा दरवाजा आपल्याला ठोठावतो आणि स्वताकडे या ना त्या प्रकाराने आकर्षित करतो.. पण आपण तिकडे जायचे कि समाधानी वृत्ती बाळगून आनंदी राहायचे हे अखेर आपल्याच हाती असते...

तेव्हा त्या पद्मनाभ मंदिरातील संपत्तीचे काय व्हायचे ते होवो पण आपल्या मनातील असंतुष्टपानाचा, असमाधानाचा, असंतोषाचा, अविवेकाचा... हा सहावा दरवाजा आपण बंदच ठेऊया.. मला वाटतं पद्मनाभ मंदिरातील घटनेचा यापेक्षा सुंदर बोध असू शकत नाही...

पराग पोतदार

शनिवार, २५ जून, २०११

एवढंसं आभाळ...!



घराशेजारी उभं राहत असलेलं एक घर... त्या घराच्या भिंती उभ्या राहताना त्याची देखभाल करण्यासाठी पत्र्याची झोपडी उभारून अनेक महिन्यापासून आमचे शेजारी बनून राहिलेलं एक कुटुंब! आई, वडील आणि दोन चिमुकली भावंड. जेमतेम ८ बाय १० मध्ये उभारलेला संसार..
घरभर... रस्त्यावर दिवसभर फिरणारी त्याची चिमुकली पावले.. पायरीपाशी पसरलेल्या रेतीमध्ये दिवसभर मनसोक्त खेळणं... आसपासच्या बंगल्यातली पोर खेळण्यांशी कशी खेळतात हे गेटवर उभं राहून पाहत राहणं... रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यामागे उगीचच पळत राहणं.. काळ्या पडून स्वतःचा रंग हरवून बसलेल्या बशीत काहीतरी खाणं... लाकडं तोडणार्या बापाच्या मागे पुढे उगीच घोटाळत राहणं.... हातगाडीवर विकायला येणाऱ्या वस्तूंकडे आशाळभूतपणे पाहत राहणं.... आणि चुकून आई किंवा बाप मेहेरबान झालाच तर स्वर्गीय आनंद देणारी कुल्फी अगर गार गार बर्फाचा गोळा अंगभर पसरेपर्यंत खात राहणं... दिवसभर हुंदडून दमल्यावर जमिनीवरच पसरलेल्या टोचणार्या चादरीवर शांत झोपूनही जाण...
या सगळ्या बालविश्वामध्ये सर्वात जिवाभावाची आणि नेहमी सोबत असणारी एक पाय मोडलेली खेळण्यातली सायकल. झोपतानाही शेजारीच पहुडलेली असायची... मित्र नव्हतेच पण त्या सायकल बरोबर काही वेगळे नाते जुळलेले असावे...
परवा सोसायटीमध्ये भंगारवाला आला... नेहमी येतो तोच... रोज दिसणाऱ्या या छोट्या कडे पाहत तो गमतीने म्हणाला, काय रे, नेऊ का तुझी हि सायकल..??''
एकदम कुणीतरी गळा पकडावा तसं अस्वस्थ होत त्याने सायकल मागे घेतली आणि काही झाले तरी सायकल मिळणार नाही हा निर्धार कृतीतूनच सांगितला.. भंगारवाला नजरेआड होईपर्यंत मुलाने त्याह्च्यावरून नजर हळू दिली नाही आणि सायकलवरची पकडही तितकीच घट्ट ठेवली होती... पुढच्या वळणावर जाऊन भंगारवाला परत आला... भंगारवाल्याचा आवाज ऐकून झोपडीतून त्या मुलाची आई बाहेर आली... मुलाचं लक्ष नाही हे पाहून तीच सायकल समोर एका हातात उचलून धरत म्हणाली, '' किती देणार याचे?'' १५ कि २० रुपये यावर थोडीशी घासाघीसही झाली.. अखेर २० नक्की ठरले आणि ती सायकल भंगाराच्या गाडीवर ठेवली गेली... तो छोटं मुलगा मात्र कोपर्यात उभं राहून हे सारं पाहत होता.. डोळ्यामध्ये प्रचंड काकुळता आणि कारुण्य दाटले होते.. आईसमोर जाऊन भांडून, रडून का होईना सायकल परत मिळवावी असे वाटत होते पण यातले त्याने काहीच केले नाही.. आश्चर्यही वाटले आणि वाईटही... मगाशी गमतीने भंगारवाला जे म्हणत होता ते आता खरेच घडत होते या सगळ्याचा किती गोंधळ त्या कोवळ्या मनात उठला असेल हे समजायला मार्ग नव्हतं... आईच्या हातावर २० रुपयांची नोट टेकवून भंगारवाल्याने गाडी पुढे घेतली... दारामागे लपून पाहणारी चिमुकली पावले मला उगीचच थरथरल्यासारखी भासली... आईचा धाक होता कि काय माहीत नाही पण आई फिरून झोपडीत शिरेपर्यंत ते पोरगं काही बाहेर आलं नाही. आईची पाठ फिरल्यावर मात्र गाडीवरची नजर हलू ना देता वेगात बाहेर आलं... आणि भंगाराची गाडी पुढे जात असताना हताशपणे पाहत उभं राहिला होतं... भंगारवाला निघून गेला.. छोट्याशा तळहातानी स्वताचेच डोळे पुसले असल्याचा मला लांबून भास झाला...
जमिनीवरच अंथरलेल्या त्या चादरीवर त्या चिमुकल्याला रात्री झोप लागली असेल का हा प्रश्न माझ्या मनात अनुत्तरीतच राहिला....

सोमवार, २० जून, २०११

बाबा!!!

आज बरोबर दीड महिना झाला... सतत अस्वस्थतेचं धनी बनून राहणं म्हणजे काय हे मी या काळात अगदी जवळून अनुभवला... अजूनही अनुभवतोय... आयुष्य हे विविधरंगी असतं.. पण कधी कधी अचानक काळे ढग दाटून यावेत ना तसंच तो दिवस असावा... मी नेहमीसारखा ऑफिसच्या कामात गढून गेलेलेला... काळ, वेळ हे सारे संदर्भ जिथे विसरून जातात अशा विश्वात मी रमलेला... अचानक फोन वाजला.. अगदी यांत्रिकतेने फोने उचलला आणि पलीकडून आवाज कानावर अक्षरश आदळला... बाबांना अपघात झालाय!!! मोठा आवाज कानावर अचानक पडल्यावर काही क्षण जसे कान आणि मन सुन्न होऊन जातं ना.. अगदी तसेच क्षण होते... पायाखालची जमिन सरकणं काय असावं याचाही अनुभव त्या काही गोंधळलेल्या क्षणांनी दिला... दोन मिनिट स्वताला सावरला आणि घराकडे वेगाने सुटलो... ऑफिस पासून घर किती लांब आहे हे पहिल्यांदा जाणवत होता... रस्त्यावरचा सिग्नल पाहत नव्हतो कि आजूबाजूची मानसं...विचारांनी गच्च भरलेला डोकं आणि डोळ्यासमोर फक्त बाबांचा चेहरा... !!! वाटेत पुन्हा एकदा फोने वाजला... कशीबशी गाडी बाजूला घेत पुन्हा फोन कानाला लावला... ''बाबांचा पाय मोडला आहे आणि हॉस्पिटल मध्ये आता आम्ही नेलेले आहे बधुदा operation करावे लागेल.. तू लवकर ये... '' पुन्हा फोन शांत झाला... भेसूर या शब्दाचा अर्थ त्या शांतेत गवसला.. पुन्हा गाडीला किक मारली आणि त्याच वेगाने गाडी पळवायला सुरुवात...!!! आजवर नुसतं नाव वाचलेल्या सुयोग हॉस्पिटल मध्ये गेलो... पाहतो तर बाबांचा पाय fracture मध्ये गुंडाळलेला... वेदना प्रचंड होत असाव्यात पण बाबा चेहऱ्यावर काहीही दिसू देत नव्हते... मी काही क्षण फक्त पायाकडे पाहत राहिलो.. माझ्या मनातील गोंधळ त्यांच्या मनापर्यंत पोहोचला असावा.. तत्काळ हसत बाबा म्हणाले.. आरे काहीही झालं नाहीये मला... पायाच्या fracture कडे बोट दाखवत ते म्हणाले, ''याला केवळ पायाभरणी म्हणतात...'' त्याक्षणी पाय जोराने ठणकत असतानाहि त्यांच्या जागृत असलेल्या विनोदबुद्धीला दाद द्यावी... कि नक्की काय करावं हे मला सुचेना.. मी कसनुसं हसलो... एवढा वेळ रोखलेला आईचा बंध मी आल्यावर मात्र फुटला... आईला रडताना पाहून बाबांनी माझ्याकडे हळूच एकदा पहिला.. मला आता जणू त्यांच्या मनातले समजले होते... मी आईला धीर दिला आग काही काळजी करू नको.. मी आलोय ना...
नक्की काय घडलंय हेच मला अजून समाजाला नव्हतं... आईनेच मला घडलेला सगळा प्रकार डोळे पुसत सांगितला... जवळच्याच एका नातेवाईकाला त्याच हॉस्पिटल मधून पाहून आई बाबा बाहेर पडले होते... लगेच घरी जाण्याऐवजी थोडा वेळ गप्पा मारू म्हणून तिथल्या एका कट्ट्यावर बसले आणि नंतर रस्ता क्रॉस करून पुढे जाणार तोच एका दुचाकीवरून भरधाव आलील्या मुलीने बाबांना जोरात धडक दिली बाबा एका बाजूला जाऊन पडले आई देखील त्या धक्क्याने पडली,,, आईला पडलेले पाहून तिला उचलायला बाबा उठायचं प्रयत्न करू लागले पण त्यांना उठताच येईना... पाय चांगलाच दुखायला लागला आणि सुजायालाही... काहीजण मदतीसाठी धावले खरे पण तितक्याच वेगाने पान्गलेही... अखेर ओळखीच्याच एकाने त्यांना हॉस्पिटल मध्ये नेले..''... आई बांध फुटल्यासारखी सांगत होती...''आम्हाला काही क्षण कळलेच नाही काय होतंय ते... काळ येणा म्हणतात ना... तेच असावं बहुदा...''
डॉक्टर आले ते हातात एक्स-रे घेऊनच... त्यांनी पायाचा दोन्ही बाजूचा एक्स-रे दाखवत सांगितले कि पायाचे हाड एका ठिकाणी सरकले आहे आणि एका ठिकाणी तुटले आहे... operation करावेच लागेल.. दुसरा पर्याय नाही.. पाय टेकवून चालण्यासाठी त्यांना किमान ६ महिने तरी लागतील.. मी आणि आईने एकमेकांच्या डोळ्यात फक्त पहिले.. आता परीस्थीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नव्हता... डॉक्टर म्हणाले तुम्ही निर्णय कळवा.. ok असेल तर लगेच करूयात operation .
अजून एखाद्या तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्यावा म्हणून काही मित्रांना फोन केले.. काहींनी खूप मदत केली काहींनी अलगद अंग काढून घेतले.. काहींनी चटकन मदतीचा, पैशांचा हातही पुढे केला... काहींनी insurance किती आवश्यक या विषयावर तासही घेतले... ३ तज्ज्ञ डॉक्टरांशी बोललो आणि त्यांचा निर्वाळा एका क्षणात एकच होता.. opration शिवाय पर्याय नाही...
संचेती हॉस्पिटल मध्ये देखील एका डॉक्टर ना भेटायला गेलो... opd मध्ये हात आणि पाय मोडलेले असंख्य जण होते.. अनेकांची परिस्थिती तर खूपच भयानक होती...त्यात अगदी दीड वर्ष्याच्या चिमुकल्या मुलांपासून ते अगदी सत्तरीच्या आजोबापर्यंत.. प्रत्येकाचे काही ना काही मोडलेले.. एक दुर्लक्ष झालेला क्षण नेमका डाव साधून गेलेला दिसत होता.. वेदना प्रत्येकालाच होत असणार तरीही त्या हॉस्पिटल मध्ये चैतन्य होते.. बाबा सहन करतील हा विश्वास मला तिथल्या वातावरणाने दिला..
डॉक्टरना आम्ही कळवले कि operation करूयात.. त्यांनी तयारी सुरु केली मी बाबांना पूर्वकल्पना असावी म्हणून त्यांच्या बाजूला बसून सांगितले. त्यावर मला वाटले, कि आमच्या कुणाच्याही दुखण्याला घाबरणारे... त्याबाबतीत नको इतके हळवे असणारे बाबा थोडे तरी अस्वस्थ होतील. पण त्यांनी पुन्हा उलट मलाच धीर दिला..
opration पूर्ण होईपर्यंत आई खूप अस्वस्थ राहणार हे ओळखून मी माझ्या सतत हसतमुख असलेल्या मित्राला बोलावले.. त्याने वातावरणातील ताण खरच सैल केला खरं पण एक तास उलटला तरी operation संपेना तेव्हा सगळ्यांनाच थोडा ताण आला... दीड तासानंतर बाबाना बाहेर आणलं तेव्हा ते अगदी फ्रेश होते... दुख अगर वेदना यांचा लवलेशही कुठे दिसत नव्हता आणि तो दिसतोय का हे शोधायची आमची धडपड सुरु होती... पण बाबांच्या मनाचा थांग सापडणं इतका सोपं नाही हे एव्हाना आम्हाला कळायला हवा होता... रूम मध्ये आणताच त्यांना सलाईन लावण्यात आले... बाबा लगेच म्हणाले... ''आता यांचे ठिबक सिंचन सुरु झाले..'' सगळे हसले आणि वातावरणही एका क्षणात बाबांनी हलके केले...
बाबांना मी जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून नुसतं बसलेला कधीच पाहिलं नाही.. कार्यमग्न हा शब्द जिवंत जगताना मी पाहिलेला आहे.. पहाटे ३ वाजल्या पासून सुरु होणार त्यांचा दिवस आता बदलनार.. त्यावर खूप मर्यादा येणार.. आणि एक पाय न टेकवता इतके महिने राहायचे म्हणजे बाबांची किती चिडचिड होईल याची आम्हाला कल्पनाच करवत नव्हती... पण आमच्या कल्पना आणि बाबांनी स्वीकारलेल वास्तव याचा ताळमेळ बसूच द्यायचा नाही असं बाबांनी ठरवलं असावं... बाबा घरी परत आले त्या दिवसापासून कसलीही कुरकुर नाही.. वेदनेने चिडचिड नाही.. आपण काळजीने पाहायला जावा तर तेच म्हणतील... काही नाही रे... होत आला बरा आता...
मला कधीतरी पायाला लागलेला तेव्हा अस्वस्थपणे येरझार्या घालणारे बाबा... माझ्या आजारपणात रात्र रात्र जागून माझ्या डोक्यावर गरम पाण्याच्या घड्या ठेवणारे बाबा... खेळून खेळून दमल्यावर पायाला तेल लाऊन चोळून देणारे बाबा... काम करून दमलेल्या आईच्या पाठीवर हाथ फिरवून देणारे बाबा... पहाटे लेखनात गढून गेलेले बाबा.. सकाळी चूल पेटवण्यात रमून गेलेले बाबा... wwf च्या कुस्त्या पाहण्यात रंगून गेलेले बाबा... अशी कितीतरी त्यांची रुप माझ्या डोळ्यासमोर पण आता walker घेऊन लंगडत चालणारे बाबा काही पाहवत नाही. वनातला सिंह एका बाजूला गुपचूप बसलेला पाहवत नाही ना तसंच हे... पण प्रत्येक बदलाशी आणि येणाऱ्या परिस्थितीशी कसा जुळवून घायचं हे बाबांनी त्यांच्या जगण्यातून शिकवलं.. ६ महिनेच काय ते ३ महिन्यात पुन्हा चालू फिरू लागतील हा विश्वासही त्यांनीच आम्हाला दिला... दुखाचा फार बाऊ न करता त्याला सामोरे कसे जायचे हे देखील त्यांनीच आम्हाला शिकवले.. परिस्थिती बदलली म्हणून साधनेत खंड न पडू देता... वाचन लेखन सतत कसे सुरु ठेवायचे हे देखील याच काळात आम्ही शिकलो... मधुमेह आणि रक्तदाब यासारखे दोन शत्रू सतत सोबत असताना देखील.. त्यावर मात करण्याऐवजि कसे पुढे जात येते हेदेखिल् शिकवले ... अशा कितीतरी गोष्टी.. नियमित बँकेत जाणे, पोस्टात जाऊन लगेच पत्र टाकणे, वेळेत कुरिअर करणे इथपासून ते चूल पेटवणे.. नराला पाडणे अशा बाबांच्या अनेक जबाबदार्या मी खांद्यावर घेतल्या खर्या पण असे बाबा होणं मला काही जमेल असं वाटत नाही... बाबांच्या राशीमधील सिंह त्यांच्या रक्ताठी पुरेपूर भिनलेला असावा.... बाबांना पुन्हा चालताना पाहण्यासाठी डोळे मात्र आसुसलेत हे बाकी खरं... डोळ्याभोवती अश्रूंचा पडदा वाढायला लागला कि थांबावं....

--
always think positive....!

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

क्रिकेट!!!






aaushyatlya kahi aathvani ya aaplyashi agadi ghatta jodlelya astat... tasach mazya balpanashi jodla gelela cricket... jevhapasun ball bat ne chagla marata yeu lagla tevhach sachin nantar kon ha prashna mazyasathi tari smapla hota... (itarana far kadhi he vatla nahi ha bhag vegla...)
pan pariksha jasjashi javal yeil tas tasa mala vatun jayacha.. ya abhayasamule apan eka navya sachin la nakki muknar aani tasach zala bagha... sachin chya aaine dhapate ghalun sachin la kar abhyas mhatla asata tar bichara basala asata ka to... pan aamchi aai agadi dhapate ghalat nasali tari tichi ek najar padali tari samajun jayacha ki aata cricket pure...
cricket chi bat mazya hatat kadhi aali aathvat nai aani tashich kiti alagat sutali tehi aathavat nahi...
4 ka 5 varshacha astana sachin style bat hatat dharun hpto kadhlyacha matra aathavata aahe... to photo aamchya diwali ankavarahi anek varshe yet hota...
cricket ha khel aaplya kade aata itka rujala aahe na ki tyaitka dusara khel asu shakato ase vatnarch nahi... mala tar ya khelane zapatun takale hote.. mi cricket ya khelat jitka gham galala aahe titka itar kashasathich nasel.. diwas diwas tahanbhuk visarun agadi chakkar yeiparyant aani khande n mandya bharun yeiparyant mi khelaloy ha khel..
cricket diwasbhar khelana aani diwasbhar match pahana yacha mala kantalach navhta... aani maze sare pen madhale mitra yach panthatale... tyamule sakali 5 vajata dole cholat aamhi cricket sathi uthayacho pan tech abhayasasathi uthne aamhala ekala pan jamale nahi...
pen madhle aamchya shalevarche te ground... parava gelelo na tevha tithe mandi ghalun basalo hoto.. angavarchya branded kapdyanchi parava na karata.. hatat mati gheun ugich khelalo char don kshan.. chan vatla.. shejarich 3-4 mula malalele shaleche dress ghalun cricket khelnyat ramali hoti... arhtat stump navhatech tevha 3 dagada lavali hoto.. aamhi pan hech karayacho.. karan stump gheun khelnyache lad pen madhe kuni puravana shakya navhta... far far shrimanti mhanaje zadachya eksarkhya fandya todun kele stump.. actualy shalechi match khelayala jevha groud var utarlo tevha pahilyanda chakchakit stump pahile.. bolling kartana kadhi ekda te udvin asa zala hota... shalechya match madhe mi ghetaleli pahili wicket mi aaj paryant visaru shakalo naiye.. agadi aatrachi kupi ughadavi na titki hi aathavan taji aani sugandhit aahe...
(to be continued...)

अरे हां कसला पुरुषार्थ